ब्रेकिंग न्यूज

जरांगे पाटील समोर सरपंच देशमुख यांची आई व पत्नीचा आक्रोश.

सरपंच संतोष देशमुख हत्येला एक वर्ष पूर्ण; कृष्णा आंधळे अद्यापही फरार असल्याने संतापाची लाट.

बीड, मासाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला (9 डिसेंबर) एक वर्ष पूर्ण झाले, मात्र या हत्याकांडातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार असल्याने गृह विभाग व पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

  संपूर्ण बीड जिल्ह्यासह महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या या हत्येचा तपास व न्यायप्रक्रिया संथ गतीने सुरू असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणातील खटला फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. मात्र एक वर्ष उलटूनही आरोपींना शिक्षा व्हायची दूर, तर मुख्य सुटरच अद्याप पोलीसांच्या ताब्यात न आल्याने जनतेत तीव्र नाराजी आहे. मृत संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनीही न्यायप्रक्रियेतील विलंबाबाबत तीव्र रोष व्यक्त केला आहे.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते आणि आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज (9 डिसेंबर) मसाजोग येथे देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी संतोष देशमुख यांच्या पत्नी व आईने आक्रोश करत हत्येतील आरोपींना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. त्यांच्या डोळ्यातील वेदना आणि न्यायाच्या प्रतीक्षेतला आक्रोश पाहून उपस्थित सर्वजण हळहळून गेले.

कुटुंबाचे म्हणणे आहे की, “न्याय न मिळालेल्या या वर्षाने आमचे आयुष्यच उद्ध्वस्त केले. आमच्या संसाराचा आधार हिरावून घेणाऱ्या गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे.”

या प्रकरणातील निष्क्रिय तपास, मुख्य आरोपीचा फरार दर्जा आणि政यंत्रणेच्या व पोलिसांच्या कारवाईतील शिथिलता यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा एकदा निषेधाची लाट उसळताना दिसून येत आहे. हत्येतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि पीडित कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी एकमुखाने मागणी होत आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button